मातीच्या गंधात देशाची ओळख सापडे,
त्याच सुगंधात वीरांची शौर्यगाथा घडते।
रणांगण गाजलं ज्यांनी रक्ताच्या धारांनी,
त्या मातीला पवित्र केलं आपल्या प्राणांनी।
शेतकऱ्याच्या घामात देशाचं स्वप्न उगवे,
मातीच्या कुशीत भविष्याचं बी रुजवे।
नांगराच्या फाळातून उमलते आशा नवी,
मातीच सांगते भारताची खरी ओळख खरी।
सीमेवर उभा जवान मातीसाठी लढतो,
आईच्या मायेचा गंध छातीत साठवतो।
गोळी झेलूनही ओठांवर हास्य ठेवतो,
मातीसाठी मरणालाही तो अभिमान मानतो।
क्रांतीकारकांच्या रक्ताने रंगली ही धरा,
स्वातंत्र्याचा दीप उजळला त्या बलिदानांनी सारा।
मातीचा गंध आजही देतो प्रेरणेचा श्वास,
देशासाठी जगणं-मरणं हाच खरा विश्वास।
माझी माती, माझा देश, माझं सर्वस्व तूच,
तुझ्यासाठी वाहीन प्राण, हे वचन आहे निश्चयाचं मूळ।
मातीचा गंध जो जपेल मनात अखंड,
तोच खर्या अर्थाने देशभक्त ठरेल सदैव प्रचंड।
कवी - प्रा.विजय व्ही अहिरे꧁߷विजयश्री߷꧂
No comments:
Post a Comment