असंच जगावं लागतं
झालं गेलं पार पडलं
असं म्हणून जगावं लागतं
अश्रूंच्या धारेत वाहत
समुद्राला भेटावं लागतं
वाळवंटात गेलं की,
तहानेला सहावं लागतं
मनातील दुःखाला लपवून
सर्व काही विसरावं लागतं
डोळ्यातील अश्रूंना पीत
जीवन तर फुलवावं लागतं
दुःखांना सांडत
असंच जगावं लागतं
मोरपंखी जीवन सरले की,
मृत्यूशय्येवर निजावं लागतं
©प्रा. विजय अहिरे "आबा"
No comments:
Post a Comment